मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच मागील २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येने आपला आलेख चढताच ठेवला आहे. राज्यात 62 हजार 97 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यातही दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात एकूण 6 लाख 83 हजार 856 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्के झाले आहे. दरम्यान, आज 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 1.55 एवढा झाला आहे.
राज्यात आज 62097 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 54224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3213464 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 683856 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2021
आजपयंत तपासण्यात आलेल्या 2,43,41,736 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 39,60,359 (16.27 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,76,998 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,690 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झाले आहे.