मुंबई – महाराष्ट्रातील करोना निर्बंधांची मुदत 31 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संबंधातील अधिसूचना काल जारी करण्यात आली आहे. राज्यातील करोना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका कायम असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
यापुर्वी वेळोवेळी या बाबतीत ज्या सवलीत देण्यात आल्या आहेत त्या कायम राहतील असेही सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यातील बहुतांशी व्यवहार खुले करण्यास या आधीच अनुमती देण्यात आली असून गेल्याच महिन्यात राज्यातील देवस्थाने खुली करण्यात आली असून शाळांमधील इयत्त 9 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करायलाही राज्य सरकारने अनुमती दिली आहे. मात्र राज्यात गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध लागू असून मास्क वापरण्यावरील बंधनेही कायम आहेत.