नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने आजपासून दारूची दुकाने, रेस्टॉरंट्स, पान दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याची माहिती दिली.
दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहचली आहे. राज्य सरकारतर्फे कोरोना संदर्भात उपाय योजना करण्यात येत असून, सर्व महाविद्यालये, विद्यापीठांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने कोरोनाचा प्रर्दूर्भाव रोखण्यासाठी ४५ लाखांचा आपत्कालीन निधी देण्यास मान्यता दिली आहे.