पुणे – राज्यात नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकूण अॅक्टिवह् रुग्णांची संख्येत दुपट्टीने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लस आणि रेमडेसिवीर इन्जेक्शनची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र राज्यात सध्या या दोन्हींचा तुटवडा आहे. लसीचा मोठा तुडवडा निर्माण झाल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेल यांसह अनेक शहरातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. याच मुद्यावरून राज्यात भाजप आणि मविआ सरकारमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे.
यातच रेमडेसिवीर इन्जेक्शनची तुडवडाच्या मुद्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’ राज्यात आजही रेमडेसिवीरचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या आमदार आशिष शेलार यांना रेमडेसिवीर मिळत नसल्याचं दावा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा लक्षात घेता भाजप नेत्यांनी विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा केला. त्यामध्ये दमणला मधील एका कंपनीने भाजपच्या नेत्यांना ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, या कंपनीला राज्य सरकारने पत्र न दिल्यानं अद्यापर्यंत रेमडेसिवीर मिळाले नाहीत.’ असं म्हणत ठाकरे सरकारचा नियोजन शून्य कारभार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
तत्पूर्वी,“देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सूरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे?,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपावर सवाल उपस्थित केला होता.