नवी दिल्ली – भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे करोना व्हायरसचे संक्रमण कमी होण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे. मात्र,लॉकडाऊनंतरही करोना व्हायरस थांबणार नसल्याचे २ नोबेल विजेत्या अर्थशास्त्रतज्ज्ञांनी सांगितले आहे.
अर्थशास्त्रतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डफला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले कि, सध्या आपण महासाथीची रोखण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊन हे याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. मात्र, आपण या आजाराची गती कमी करू शकतो. परंतु, रोखू शकत नाही. कारण जे लोक एका दिशेने दुसरीकडे जात आहे. ते अदृश्यपणे आजार पसरवत आहे.
शहरातील झोपडपट्टीत आजार रोखणे कठीण आहे. तसेच देशातील अनेक भागात वैद्यकीय शिक्षण न घेतलेले डॉक्टर आहे. अशा ठिकाणी करोनाग्रस्त जातील आणि बरे न वाटल्यास रुग्णालयात जातील. अशाने हा आजार पसरत जाईल. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये ग्रामीण भागांसह देशभरात करोनाच्या उद्रेकाची तयार राहावे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी काही उपाय-योजनाही करण्यास सांगितले आहे.
– सर्वात महत्वाचे म्हणजे घरातील एका व्यक्तीला तरी करोनाची प्रमुख लक्षणे माहिती असायला पाहिजे.
– कितीही काळजी घेतली तरीही काही लोकांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे माहिती लपविणे शक्यतो टाळावे.
– याप्रकरणाबाबत रिपोर्ट करण्यासाठी हॉटलाईन असायला हवी किंवा आशासेविका असाव्यात.
– ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे.
– रिपोर्टची तुलना लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून आजार आणखी कुठे पसरू शकतो याचा अंदाज येईल.
– प्रत्येक राज्यात एक मोबाइल टीम असावी, यामध्ये डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी असावेत. त्यांच्याकडे टेस्ट किट, वेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणं असावीत. जिथंही कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढत असतील, तिथं ही टीम जाईल आणि तपासणी, उपचार सुरू करेल.
– सरकारी आणि खासगी आरोग्य तज्ज्ञांनी गरज पडेल तिथं जाण्याची तयारी ठेवावी, खासगी आणि सरकरी दोन्ही रुग्णालयातील परिस्थिती सांभाळावी.
– सोशल ट्रान्सफर स्कीम लागू करावी, जेणेकरून अर्थव्यवस्था डगमगणार नाही आणि लोकं नियम मोडणार नाही. सध्या सरकार जी काही सोय करत आहे, तितकी पुरेशी नाही. लोक घराबाहेर पडू नयेत, यासाठी त्यांना आर्थिक मदत करायला हवी.
– सर्वात शेवटचं जोपर्यंत या व्हायरसवर लस येत नाही, तोपर्यंत युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहायला हवं. त्यानंतर शक्य तितक्या लोकांना लस दिली जावी आणि आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर द्यावा जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती आल्यास त्यासाठी आपण तयार असू.