औरंगाबाद – नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने औरंगाबाद प्रशासनाने कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. 30 मार्चच्या मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत म्हणजेच 10 दिवसांचा लाॅकडाऊन असणार आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी बंद राहणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लाॅकडाऊन काळात किराणा मालाचे दुकान, दूध हे सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंतच सुरु असतील आणि त्यानंतर बंदी असेल. लाॅकडाऊन दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडल्यास गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
औरंगाबादमध्ये दिवसाला 800हून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद होत आहे. औरंगाबादमध्ये अंशत: लाॅकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, तरीही करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन नियमानुसार, किराणा मालाचे दुकाण, दूध हे दुपारी बारावाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद असणार आहेत. महत्वाचं म्हणजे उद्योगांना या लाॅकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी असेल. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. सार्वजनिक थुंकणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे.
दरम्यान,