पुणे : भारतात कोरोना विषाणू आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणां सतर्क झाल्या आहेत. राज्यात गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे.
राज्यातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर मंदिर प्रशासनानं विषाणूपासून बचावासाठी विशेष काळजी घेत आहेत.
दरम्यान शिर्डीमध्ये साईमंदिराची ओल्या कापडांनी मंदिराची स्वछता करण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी आरोग्य टीमसुद्धा सज्ज ठेवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने भाविक आणि कर्मचाऱ्यांना मास्क बांधणे बंधनकारक केलं आहे. परदेशी नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.