नवी दिल्ली : देशातील करोना संसर्ग अजूनही सुरुच आहे. दरम्यान, बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 815 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असल्याचे माहिती समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 38 रुग्णांनी करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे करोनाचा वाढता संसर्ग आणि दुसरीकडे पावसाळ्याच पसरणाऱ्या साथीच्या रोगांमुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्याने आढळलेल्या करोना रुग्णांच्या संख्येत किंचिंत घट झाली असली, तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/rulecW6qZv pic.twitter.com/XTQj05wpxK
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 8, 2022
बुधवारी देशात 18 हजार 930 नवी रुग्ण आढळले होते आणि 35 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या देशात 1 लाख 22 हजार 335 रुग्ण करोनो संक्रमित आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 15 हजार 899 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यासह आतापर्यंत भारतात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 37 हजार 876 वर पोहोचली आहे.
भारतात करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा नवा सबव्हेरियंट आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याची नोंद घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितलं आहे की, यासंदर्भात संशोधन सुरु आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुरुवारी 2 हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन हजार 238 जणांनी करोनावर मात केली आहे. बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 3238 जणांनी करोनावर मात केली आहे.