कोलकाता – देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून रोज नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या देखील वाढत चालली आहे. कोरोनाचे हे संकट थोपवताना आरोग्य यंत्रणेचे कंबरडे मोडून पडले आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना देखील पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दीलीप घोष यांनी कोरोना विषाणूचा नायनाट झाला असल्याचा अजब दावा केला आहे.
Corona has gone. Didimoni (Mamata Banerjee) is acting and imposing lockdown so that BJP can’t organise meetings and rallies in the state. No one can stop us: Dilip Ghosh, BJP President, West Bengal at a public rally in Dhaniakhali (9/9/2020) pic.twitter.com/VVSJ0mSBCg
— ANI (@ANI) September 11, 2020
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगाल मधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच आज पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दीलीप घोष यांनी, “कोरोनाचा नायनाट झाला असतानाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉक डाऊन कायम ठेवला आहे. यामागचे कारण त्यांना भाजपच्या निवडणूक प्रचार सभा रोखायच्या आहेत.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील अनेक नेत्यांनी कोरोना संकट अद्याप टळले नसून जनतेने योग्य ती काळजी घ्यावी असे सूचित केले आहे. असे असताना देखील कोरोना संकटाचा नायनाट झाल्याचा घोष यांचा दावा नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे.