टाकळी हाजी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आपल्या कलेच्या आधारे उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतांनाही याचे परिणाम सहन करावे लागत आहेत. वाघ्या-मुरळी हे लोककलावंत अनादिकालापासून धर्म जागरण व कुलाचार पालन व समाजप्रबोधन करत असून कोरोना साथीमुळे चालू असलेल्या लॉकडाऊनमूळे जागरण गोंधळ कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे सदर कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले असून उपासमारीला तोंड देत आहेत.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1334575096882192/
सरकारने सदर गोष्टींचा विचार करून सामाजिक अंतर ठेवून वाघ्या-मुरळी कार्यक्रमांना परवानगी द्यावी तसेच या कुटुंबीयांना पेंशन योजना चालू करावी व आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे व शिरूर तालुकाध्यक्ष बाळासो.कान्हेरे यांनी सर्व कलावंताच्या वतीने मुख्यमंत्री, सांस्कृतिक व न्यायमंत्री यांच्याकडे केली आहे.