नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे. आतापर्यंत करोनाने २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे.
Spike of 3604 #COVID19 cases in the last 24 hours; total positive cases in the country is now at 70756, including 46008 active cases, 22454 cured/discharged/migrated cases and 2293 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/0xm42EjP6Z
— ANI (@ANI) May 12, 2020
भारतातील करोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ३१.१५ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी दिली. करोनाचे रुग्ण वाढत असले तरी समूह संसर्ग झालेला नाही. करोनाचे अनेक रुग्ण आढळलेली ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या विभागांमध्ये घराघरांत जाऊन चाचणी घेणे व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजने गरजेचे असल्याचेही लव अगरवाल यांनी सांगितले.
गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात दररोज करोनाबाधितांची संख्या वाढत असताना गेल्या चोवीस तासांमध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यात अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगर हवेली, गोवा, जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर, ओडिशा, मिझोराम आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. दीव-दमण, सिक्किम, नागालँड, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेश व राज्ये आत्तापर्यंत करोनामुक्त राहिलेली आहेत.