चांदवड, औरंगाबादच्या पाहुणचाराने झाली करोनाची लागण…
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरातील आयशा कॉलनितील एका ५८ वर्षाच्या महीलेसह करंजी येथुल ५० वर्षाच्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने करोनामुक्त तालुक्यात एकाच दिवशी दोन करोनाबाधीत रुग्ण आढळल्याने खळबत्र उडाली आहे.
करोनाच्या या महामारी संकटात कोपरगाव तालुका करोना मुक्त असल्याने नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडत असताना पुन्हा एका ५० वर्षीय व्यक्तीला व ५८ वर्षाच्या महीलेला करोना संसर्गजन्य विषाणुची लागण झाल्याने तालुक्यासह शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या बाबत तहसीलदार योगेश चंद्रे व वैद्यकीय अधिकारी डॉ. डॉ. कृष्णा फुलसौंदर ,संतोष विधाटे यांच्याकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, तालुक्यातील करंजी थेथील एका ५० वर्षाचा व्यक्ती हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आरोग्य विभागात काम करणाऱ्या मुलाकडे गेल्या आठवड्यात भेटण्यासाठी गेला असता तेथे त्यांना करोना संसर्गजन्य विषाणुची लागण होत असल्याचे लक्षणे आढळू लागल्याने तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते करोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले.
कोपरगाव तालुक्यातून चांदवडला जाण्यापुर्ण करोनाची कोणतीही बाधा नसताना अचान करोनाची लागण कोणामुळे व कशी झाली याचा शोध प्रशासकीय यंत्रणा घेत आहे. बाधीत व्यक्तीच्या संपर्कात करंजी येथील चौघांना वैद्यकीय विभागाने तपासणीसाठी करोनटाईन केले असुन नाशिक जिल्ह्यातून कोपरगाव तालुक्यात करोना विषाणुचा शिरकाव होणार नाही याची विषेश खबरदारी घेतली जात असल्याची माहीती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. बाधीत व्यक्तीवर सध्या चांदवड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, शहरातील संजयनगर येथील ५८ वर्षीय करोना बाधीत महीला ही दोन महीण्यापुर्वी औरंगाबाद येथे जावून आली होती त्या नंतर बाधीत महीलेला घसाव छातीत त्रास होवू लागला दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथील मुलगी व जावाई येवुन भेटून गेल्यानंतर अधिक त्रास जाणवू लागल्याने बाधीत महीलेला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी घेवुन गेले असता निमोनियाचे लक्षणे आढळून आले. त्यामुळे नातेवाईकांनी घशाचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याच्या खाजगी प्रयोग शाळेत पाठविले होते त्यात संबधीत महीला करोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महीलेच्या संपर्कातील ७ लोकांना कोरंटाईन करण्यात आले असुन बाधीत महीलेवर उपचार सुरु आहे.
दरम्यान, करोना मुक्त असलेला कोपरगाव तालुका पाहुणाचारामुळे बाधीत होत आहे. पैपाहुण्यांची ये- जा वाढली आहे. प्रशासनाच्या नजरा चुकवून परगावी जाणे येणे वाढले आहे. बाधीत रुग्ण हे शेजारच्या वैजापूर ,येवला नाशिक, औरंगाबाद या करोना बाधीत तालुक्यात व जिल्ह्यात जावून आल्याने व तेथील नातेवाईक आल्याने त्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. करोनापासुन सुरक्षित असलेला कोपरगाव तालुका बाहेरगावच्या येण्या जाणाऱ्यामुळे असुरक्षित होत आहे.