नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील केसांत कबीर नगर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 18 सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हाधिकारी रवीश कुमार गुप्ता यांनी शनिवारी हि माहिती दिली. या व्यतिरिक्त शुक्रवारी १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. ते म्हणाले की, देवबंद येथून जिल्ह्यात आलेल्या एका विद्यार्थ्याला २ एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती.
त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबातील ३० सदस्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. बखीरा पोलीस स्टेशन परिसरातील आणखी एका गावात एक व्यक्ती संक्रमित असल्याचे आढळले आहे. तो नुकताच मुंबईहून परतला. त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांना विलगीकरण आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत तो विभाग पूर्णपणे सील करण्यात आल्याचे ते म्हणाले. याशिवाय उत्तर प्रदेशच्या सहारनपुर जिल्ह्यात शनिवारी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १६० वर पोहचला. सहारनपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस. सोधी यांनी सांगितले की, सहारनपूरमध्ये आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या १५१ होती. मात्र जिल्ह्यात ९ कोरोनाबाधित रुग्ण आढल्यानंतर रुग्ण संख्या १६० वर पोहचली आहे.