विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी केले आयोजन
पुणे :- दत्तवाडी पोलीस स्टेशन व पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी आज विशेष पोलीस अधिकारी यांची कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी या उद्देशाला अनुसरून पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व भागात सायकल रॅली काढली होती. ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, सहाययक पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे,पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार ,व २८ विशेष पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.
या प्रसंगी सर्व एस. पी. ओ यांना एक सारखे टी शर्ट,फेस मास्क, हँड ग्लोव्हज देण्यात आले होते. पोलीस दलाच्या शिस्ती प्रमाणे शिस्तबद्ध रॅली काढण्यात आलेली होती. संपूर्ण परिसरात नागरिकांनी पुष्पवृष्टी करून विशेष पोलिस अधिकारी यांनी कोविड १९ च्या कालावधीत केलेल्या कार्याचा गौरव केला आहे.
या कार्यक्रमाचा समारोप पोलीस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा गायकवाड यांच्या हस्ते झाला.
त्या प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संपूर्ण कोरोना संक्रमण कालावधीत या सर्व विशेष पोलीस आधीकारी यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडून समाजात अडचणीत असलेल्या नागरिकांना पोलीस दलाच्या बरोबरीने मदत करण्याचे कार्य केले आहे. समाजात आज नैराश्यातून आत्महत्या होणे, स्त्रियांचा कौटुंबिक छळ असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी हे विशेष पोलीस अधिकारी या पुढे सुदधा कार्य करणार आहेत. तसेच निवृत्त पोलीस अधिकारी व इतर विभागातील अधिकारी वर्गाचा अनुभवाचा उपयोग या कार्यात व्हावा तसेच त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावे.
सहभागी सर्व विशेष पोलीस अधिकारी यांना डॉक्टर बी.पी.गायकवाड (निवृत्त सहसंचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र,), सुरेश कोते( चेअरमन लिज्जत पापड), अशोक शेजाळ (निवृत्त पोलीस उपअधीक्षक), संजय निकम(निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त), जिरगे (निवृत्त सहायक पोलिस अधीक्षक). डॉक्टर संजय पाटील(संचालक:-एम.आर.एस.ए. सी), संतोष मोरे (सी एस आर कन्सल्टंट), विजयराव छलानी (चार्टरर्ड अकाउंटंट), शिवानंद गोखले यांच्या हाते विशेष प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले.
डॉक्टर बी पी गायकवाड, गणपतराव निकम व अशोकराव शेजाळ, सुरेशराव कोते, संतोष मोरे, शिवानंदजी गोखले, शंकरराव जिरगे, संजयराव निकम या प्रमुख अतिथी मान्यवर यांनी विशेष पोलीस अधिकारी यांच्या कार्याचा गौरव केला आहे. विशेष पोलीस अधिकारी यांनी आपल्या सायकलला “नका करू उगाच दंगा, भेटून पोलिसांना सांगा, पोलिसच खरे मित्र, सच्चा आधार खरा मित्र,नका करू नैराश्यातून आत्महत्या, अशा स्वरूपाचे घोषवाक्य लिहिलेले फलक लावले होते.