नवी दिल्ली- 24 तासात देशात ‘कोरोना’चे 328 नवे रूग्ण आढळले असून त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे आणि ही संख्या 2000 च्या जवळपास पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 50 पर्यंत पोचली आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची आणखी 3 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, 2 पुण्यातील आणि 1 बुलढाणामधील आहेत. राज्यात कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची संख्या वाढून 338 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सर्वात जास्त 9 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरात मध्ये ६ , कर्नाटक ३, मध्य प्रदेशात 3, पंजाबमध्ये 3, तेलंगणात 3, पश्चिम बंगालमध्ये 3, दिल्लीत २, जम्मू-काश्मीरमध्ये २, उत्तर प्रदेशात २ आणि केरळमध्ये २, तर तामिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एकाच मृत्यू झाल्याची माहिती आहे.