दिल्ली : आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद यांच्याशी सामना करण्यासाठी भारत आणि उजबेकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या सहकार्य कराराला मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली. या कराराचा उद्देश दहशतवाद आणि दहशतवादाला दिली जाणारी आर्थिक मदत तसेच संघटित गुन्हे आणि त्यासंबंधीच होणारे अपराध थांबवता यावेत असा आहे.
याशिवाय देशांतर्गत असलेले कायदे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरताना दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्था आणि त्यांच्या नियमांचे पालन करताना अधिकारी वर्गांमध्ये सहकार्यवृद्धी होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून सामंजस्य करार करण्यात आला आहे.