बदनापूर – खुशाल गायी कापा, मतदानाच्या आदल्या दिवशी येणारी लक्ष्मी ठोकरू नका आणि शेतकऱ्यांना साले म्हणून वाद निर्माण करणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
रावसाहेब दानवे यांनी जन आशीर्वाद यात्रेची काँग्रेस नेते राहुल गांधी काहीच कामाचे नसल्याचं म्हटलं. तसेच वादग्रस्त शब्द वापरले. एखाद्या केंद्रीयमंत्र्यांनी टीका करताना एवढ्या खालच्या थराला जाण्याची महाराष्ट्रातील, ही पहिलीच घटना आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळात सामील झालेल्या नेत्यांना घेऊन भाजपने जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं आहे. मराठवाड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. बीड, संभाजीनगर प्रवास करून ही यात्रा शुक्रवारी जालना येथे पोहोचली होती.
बदनापूर मतदारसंघात यात्रेच्या निमित्ताने सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना दानवे यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळालं. ते म्हणाले, राहुल गांधी आणि मी गेली 20 वर्षे सभागृहात एकत्र आहोत. पण राहुल गांधी काहीच कामाचे नाही, अशी टीका दानवेंनी केली.