नवी दिल्ली – पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना भाजपने रविवारी (5 जून) निलंबित केले. यानंतर नुपूरने माफीही मागितली आणि तिच्या कुटुंबाला असलेल्या धोक्याबद्दलही सांगितले. या सगळ्यात आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांच्या निलंबनाचा निर्णय भाजपने अरब देशांच्या नाराजीनंतर घेतल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून देशासह जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आता काँग्रेसकडून भाजपावर टीका करणयात येत आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’फारच उशीर झालेली जाणीव जितकी जास्त काळ टिकेल तितके देशाचे भले होईल.भाजप नेत्यांकडून इतर धर्म व पंथांविरुध्द टोमणे, खोडसाळपणा, धोरणे, कृती सर्रास झाल्या आहेत. नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाई पुरेशी नाही, पंतप्रधान, गृहमंत्री व आदित्यनाथांपासून सुरू होणारी मोठी यादी आहे’ असं म्हणत भाजपला खडेबोल सुनावले आहे.
सचिन सावंत यांचे ट्विट
फारच उशीर झालेली जाणीव जितकी जास्त काळ टिकेल तितके देशाचे भले होईल.भाजप नेत्यांकडून इतर धर्म व पंथांविरुध्द टोमणे, खोडसाळपणा, धोरणे, कृती सर्रास झाल्या आहेत. नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाई पुरेशी नाही, पंतप्रधान, गृहमंत्री व आदित्यनाथांपासून सुरू होणारी मोठी यादी आहे pic.twitter.com/pGXqU5zH7J
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 5, 2022