Controversial statement of POK PM । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. आता पाकिस्तानकडून वादग्रस्त विधाने दिली जात आहेत. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या पंतप्रधानांनीही भारताविरुद्ध एक भडकाऊ विधान केले आहे. त्यांनी या हल्ल्याचे समर्थन करून हा हल्ला बलुचिस्तानात घडलेल्या घटनांचा बदला असल्याचे म्हटले आहे.
चौधरी अन्वारुल हक यांनी ही माहिती दिली Controversial statement of POK PM ।
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल धमकीवजा बोलताना, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की रक्त सांडावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही. जर तुम्ही बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लोकांचे रक्त सांडले तर तुम्हाला त्याची किंमत दिल्लीपासून काश्मीरपर्यंत चुकवावी लागेल.”असे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले,”पीओकेचे सैनिक भूतकाळात अशा हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत आणि भविष्यात अधिक जोमाने सहभागी होतील. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही मागे हटणार नाही.”असे म्हणत त्यांनी भारताला धमकी दिली आहे.
‘भारताच्या जलद कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण” Controversial statement of POK PM ।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर उपाययोजनांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आता भारतासोबतचा व्यापार संपवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) बैठक बोलावली, जी सुमारे दोन तास चालली. या बैठकीत भारताच्या निर्णयांवर चर्चा झाली आणि त्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केली. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे.
भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याबद्दल पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की पाणी अडवणे हे युद्धाचे कृत्य आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने भारताचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या भारतीय लष्करी सल्लागारांना (लष्कर, नौदल आणि हवाई दल) ३० एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असा निर्णयही पाकिस्तानने घेतला आहे.
यासोबतच, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या दूतावासांमध्ये प्रत्येकी फक्त ३० अधिकारी काम करतील असा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित केल्याचा पाकिस्तानने विरोध केला आहे आणि जागतिक बँक आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की जागतिक बँक या कराराचा एक भाग आहे आणि म्हणूनच भारताला असा निर्णय एकट्याने घेण्याचा अधिकार नाही.