पुणे – भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा व कॉंग्रेसचा इतिहास हा एकच आहे. स्वातंत्र्याचा लढा हा लोकमान्य टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदी थोर स्वातंत्र्य सेनानींच्या नेतृत्वाखाली लढला गेला. या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि कॉंग्रेसने दिलेले योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. अशा भावना कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॉंग्रेस भवन येथे बागवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हास पवार व शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते झाला. स्वातंत्र्यसैनिक सरस्वती मराठे, अन्नपूर्णा वाघ, हरिहर अनंत नाबर, मुकुंदराव नगरकर यांचे चिरंजीव संजय नगरकर, सीताबाई चोरगे यांचे चिरंजीव किशोर चोरगे, शशिकला दत्तात्रय क्षीरसागर यांचे नातू चैतन्य क्षीरसागर, नरसिंह राघवेंद्र मळगे यांची मुलगी माय मठकर व महेश्वरी पुराणिक, जगन्नाथ पाटसकर यांचे चिरंजीव प्रदीप पाटसकर व मुलगी वंदना पाटसकर, उद्धवराव इंगवले यांचे चिरंजीव भारत इंगवले, विठ्ठल भल्ला यांचे नातू आनंद खन्ना, सुवालाल व मीनाबाई यांचे चिरंजीव ऍड. अनिल कांकरिया यांना सन्मान करण्यात आला.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रज सरकारला विरोध केला. रवींद्रनाथ टागोर यांनी देशाला राष्ट्रगीत दिले. आज भारताच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. या स्वातंत्र्यसेनानींनी केलेले योगदान देश कधीही विसरू शकत नाही.
यावेळी आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, व्यर्थ न हो बलिदान या अभियानाचे समन्वयक ऍड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नीता रजपूत, वीरेंद्र किराड, अरविंद शिंदे, लता राजगुरू, अजित दरेकर, अविनाश बागवे, डॉ. सतीश देसाई, नितीन परतानी, अनिल सोंडकर, द. स. पोळेकर, रमेश अय्यर, संगीता तिवारी, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, शिवाजी बांगर, विठ्ठल गायकवाड, चैतन्य पुरंदरे, अमीर शेख, रजनी त्रिभुवन, भारती कोंडे, सोनाली मारणे आदी उपस्थित होते.