देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू येथे तीन आठवड्यांपासून पिण्याच्या दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा योजना देहू ग्रामपंचायतीने एक जुलै रोजी हस्तांतरित करून घेतली आहे. गत तीन आठवड्यांपासून देहू परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा होत असून, दोन-तीन दिवसांपासून पाण्यामध्ये आळ्या ही येत असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहेत. येथील मंगल कार्यालया मागील भागात पिण्याच्या पाण्याचे भूमिगत जलवाहिनी ड्रेनेज लाईन मधून गेल्याने कदाचित फुटले असल्याचे तर दीड महिन्यापासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे.
पाणी योजना ग्रामपंचायतीने सुरू केल्यापासून पाच कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचे वेतन आणि तीन लाख 18 हजार पाचशे वीस रुपयांचे वीज बिल अदा केले आहे. ग्रामपंचायतीकडे योजना हस्तांतरित झाल्यानंतर पाणी शुद्धीकरणासाठी लागणारे क्लोरीन संपुष्टात आले असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने यांच्याशी संपर्क साधला असता योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केले आहे. टीसीएल हे पाणी शुद्धीकरणासाठी असल्याचे, तर ग्रामपंचायतीला याबाबत माहितीही दिल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर यांच्याशी संपर्क साधला असता जलशुद्धीकरण केंद्रावर “टीसीएल’ पावडर शिल्लक असल्याचे आणि त्याचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.