नवी दिल्ली – देशाच्या विविध भागात सध्या 189 नवीन रेल्वे लाईन्स टाकण्याचे काम सुरू आहे अशी माहिती सरकारच्यावतीने आज लोकसभेत देण्यात आली. रेल्वे मंत्री पीयुष गोयल म्हणाले की या नव्या लाईन्सच्या कामांवर 3 लाख 47 हजार कोटी रूपये इतका खर्च येणार आहे.
यातील प्रकल्पांवर मार्च 2019 पर्यंत एकूण 76 हजार 917 कोटी रूपये इतका खर्च करण्यात आला आहे. ज्या नवीन रेल्वेलाईन्सचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत त्याची एकूण लांबी 2 हजार 555 किमी इतकी आहे.
या नव्या लाईन्सच्या कामाला झोननुसार अनुमती दिली जाते. या नव्या लाईन्सच्या पुर्ण कामात सरकारला 3 लाख 47 हजार इतका खर्च येणार असून त्यातून अनेक भागातील रहिवाशांना रेल्वे सेवा मिळणार आहे असेही मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.