मुंबई- सुटे तेल विकल्यामुळे करोना व्हायरस वाढण्याचा धोका वाढतो यासाठी सुट्टी तेल विकण्यावर बंदी घालण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करीत असल्याचे बोलले जात आहे.
असे झाले तर त्याचा गरीब लोकांवर जास्त परिणाम होणार आहे. कारण या लोकांची पॅकेजड् तेल खरेदी करण्याची क्षमता नसते. त्यामुळे ते सुटे तेल खरेदी करून आपली दैनंदिन गरज भागवत असतात. पॅकेज्ड तेल पाकीटात जास्त असते आणि त्याची किंमत जास्त असते. जर बंदी घातली गेली तर त्या लोकांच्या तेल वापरण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचा गरीबांच्या एकूण आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
ला:क डाऊनमुळे देशातील ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीवर बराच बदल झाला आहे. ज्यांना परवडते असे लोक पॅकेज्ड तेल खरेदी करण्यास प्राधान्य क्रम देत आहेत. लाषक डाऊनच्या काळामध्ये हॉटेल आणि खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांकडून तेलाचा वापर कमी झाला आहे. ही परिस्थिती पूर्ववत होण्यास 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. जर सुटे तेल विकणे बंद केले तर भारताच्या एकूण तेल वापराच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसे झाले तर भारताची आयात काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. सध्या भारत आपल्या गरजेच्या 65 टक्के खाद्य तेल आयात करतो.