नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून पंतप्रधानपदाच्या चर्चांना जोर पकडला आहे. अशातच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान पद मिळाले नाही तरी चालेल असे वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाची इच्छा सोडली कि काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, २४ तासांतच काँग्रेसने युटर्न घेतला आहे.
गुलाम नबी आझाद यांनी म्हणाले कि, पंतप्रधान पदासाठी काँग्रेस इच्छूक नाही हा दावा खोटा आहे. काँग्रेस सर्वात जुना आणि मोठा राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचे असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे. आम्हला केवळ एनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यास सर्वानुमते निर्णय घेऊन पंतप्रधान ठरवला जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
Ghulam Nabi Azad, Congress: No, this is not true that Congress will not claim or Congress is not interested in Prime Minister post. Of course we are the biggest and oldest political party. If we have to run the govt for five years biggest political party should be given a chance. pic.twitter.com/g31TFMHtJc
— ANI (@ANI) May 17, 2019