मुंबई – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विविध राज्यांमध्ये पक्षाला मिळणारे यशापयश पक्षांतर्गत परिस्थितीवर परिणाम करणारे ठरणार आहे.
यातच आसाममधील विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. राज्यात 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी ही निवडणूक होईल. तर 2 मे रोजी निकाल घोषित होईल. सध्या राज्यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचे अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी या पक्षाने सगळी शक्ती पणाला लावली आहे.
आसाममधील विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. राज्यात 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचे अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी या पक्षाने सगळी शक्ती पणाला लावली आहे.
या निवडणुकीच्या निवडणुकींच्या प्रचारा दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कामरुप येथे प्रचारसभा घेतली. या प्रचाराडेली शाह यांनी काँग्रेसवर जाती धर्मावरून समाजात फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत हल्लाबोल केला.
काय म्हणाले अमित शाह
“काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पाहत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र ‘सबका साथ सबका विकास’ अशी आहे.”