नवी दिल्ली – येत्या मे महिन्यात पाच राज्यांतील निवडणुक निकाल लागणार असून या निकालानंतर दिल्लीत पुन्हा कॉंग्रेसचे सरकार प्रस्थापित होण्याची प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास केरळातील कॉंग्रेस नेते ओमान चंडी यांनी व्यक्त केला आहे. चंडी हे स्वत: केरळातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्या विषयी पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की केरळात कॉंग्रेस मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या संबंधात कोणतीही समस्या उद्भवणार नाही कारण पक्षाचे नेते या संबंधात जो निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य असेल.
केरळात गेल्यावेळी भाजपला केवळ एक जागाच मिळाली होती. त्यामुळे त्यांना यंदाहीं केरळातून फार अपेक्षा ठेवता येणार नाही असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की गेल्या विधानसभेच्यावेळी राज्यातील डाव्या आघाडीने लोकांना भरमसाठ आश्वासने दिली होती. ती त्यांनी पुर्ण न केल्याने लोकांचा त्यांच्यावर रोष असल्याने कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीच केरळात सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.