पुणे – कृषी प्रधान देशातील शेती उद्ध्वस्त करणारे कायदे भाजप सरकारने आणले आहेत. उद्योगपती आणि भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे रद्द होईपर्यंत कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला.
भाजप सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन केले जात असून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. कसबा मतदारसंघ ब्लॉक कमिटीच्या वतीने महात्मा फुले मंडईत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
स्व. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून मोहिमेला सुरवात झाली. मोहन जोशी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी त्यावर उस्फूर्तपणे स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, रोहित टिळक, आबा बागुल, विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, निता रजपूत, बाळासाहेब अमराळे, प्रविण करपे, सचिन आडेकर, प्रशांत सुरसे, बबलु कोळी, सागर सासवडे, साहिल राऊत, गौरव पळसकर, मकरंद मणकिकर, भोला वांजळे, शाबीर खान, चेतन अगरवाल, आयुब पठाण, योगेश भोकरे, शैलेश आंदेकर, गणेश शेडगे, तिलेश मोता, हेमंत राजभोज, नरेश नलावडे, संदिप अटपाळकर, अंजनीताई सोलापूरे, सौरभ अमराळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कांबळे यांनी केले तर अविनाश आडसुळ यांनी आभार मानले.