नवी दिल्ली – काँग्रेसच्या सद्यपरिस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी मोठ वक्तव्य केले आहे. “सध्या पक्ष एका कठीण परिस्थितीतून जात आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या विजयाची शक्यता कमी आहे. तसच पक्ष सध्या आपले भविष्यही ठरवू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये पोहोचला आहे,” असे खुर्शीद म्हणाले.
Salman Khurshid, Congress: We need to know why we are in the state in which we are. Unfortunately despite our earnest pleading Rahul Gandhi decided to step down and resign from the president post. We wanted him to continue but it was his decision and we respect it. https://t.co/P22EyRzeFa
— ANI (@ANI) October 9, 2019
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातूनच पक्ष अजून बाहेर पडला नसल्याने पक्षाला संकटांचा सामना करावा लागत आहे. “लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी गडबडीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दुर्दैवाने आमची विनवणी असूनही राहुल गांधींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तो न देता काम पुढे चालू ठेवावे, अशी आमची इच्छा होती. परंतु, हा त्यांचा निर्णय होता आणि आम्ही त्याचा आदर करतो, असे ते म्हणाले.
Salman Khurshid: This is perhaps the only time in history that a major defeat has not caused the party to lose confidence in their leader. If he had stayed&was around, we would’ve understood better the causes of our defeat & be better prepared to fight the battles in coming times pic.twitter.com/egG0rLnTIo
— ANI (@ANI) October 9, 2019
त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आल. ऑक्टोबर महिन्यात दोन्ही राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या नावावर विचार केला जाणार असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले आहे.