मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख पुन्हा एकदा अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असा केला होता. सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याचं सांगत त्यांनी ते पायात पाय घालून आपोआपच पडेल असा दावाही केला होता.
“…म्हणून आमचं सरकार अमर, अकबर आणि अँथनीच”
And all the three Amar, Akbar, Anthony will beat Robert Seth i.e @BJP4Maharashtra 😜 https://t.co/4n99ILdSy5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 7, 2020
दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनंही प्रत्युत्तर दिल आहे. “अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” अशी टीका काँग्रेसनं भाजपावर केली आहे.
काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे की,’अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील.’ असं म्हणत सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.
तत्पूर्वी, दानवेंच्या टीकेचा समाचार घेताना राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी, ‘महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न हाणून पाडतो आणि कोरोनाच्या कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. यामुळे त्यांनी केलेली अमर-अकबर-अँथोनीचं सरकार असल्याची टीका बरोबर आहे.’ असा पलटवार केला होता.