नवी दिल्ली – देशभक्ती आणि राष्ट्रवादाकरता प्रेरित करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याऐवजी या प्रयत्नांना विरोध करण्यातच कॉंग्रेस पक्ष धन्यता मानत असून हा पक्ष पूर्णत: दिवाळखोर झाला असल्याची टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या देशभर हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्याला कॉंग्रेसकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. याकडे लक्ष वेधल्यावर रिजिजू म्हणाले की, कॉंग्रेसकडे आता कोणता मुद्दाच राहिलेला नाही. त्यामुळे ते अप्रासंगिक मुद्दे उपस्थित करत आहेत व हा प्रकार राष्ट्रहितासाठी हानिकारक आहे.