मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरू असून पक्षाच्या नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांची बैठका पार पडत आहे. तसेच यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आगामी मुख्यमंत्री हा आमच्याच पक्षाचा होणार असं सागण्यात येतय.
भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा रंगत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी ‘विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा किंवा शिवसेनेचा नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री होणार,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर चौफेर टीकासुध्दा केली. ‘