मुंबई/नवी दिल्ली : दीर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर राज्यातलि मंत्रीमंडळचा सोमवारी (दि.30) विस्तार झाला. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये खातेवाटपावरून सुरू असणारा घोळ संपत नसल्याने हा वेळ लागल्याचे मानण्यात येत होते. दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोमवारी मंत्र्यांच्या यादीला अंतिम रूप दिले.
सोमवारी शपथविधी झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेत्यांनी सोमवारी राहूल गांधी आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या मंत्र्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, केसी. वेणुगोपाल आणि पक्षाचे सरचिटणीस आशिष दुवा होते. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता.
मंत्रीमंडळात तेच ते चेहरे देण्यापेक्षा अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत वरीष्ठ नेत्यांमध्ये मतभेद होते. मात्र पक्षाचा कार्यक्रम राज्यात पोहोचवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, महा विकास आघाडीच्या वाटचाल आणि पक्षाचे धोरण याबाबात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली.