अहमदनगर – महिना उलटून जात आहे परंतू, राज्यात कोणाचेही स्थिर सरकार येण्याच्या दिशेने हालचाली दिसत नाही. यातच एकीकडे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास कॉंग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात आला होता, तर दुसरीकडे शिवसेनेसोबत जाण्यावरुन काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील संगमनेरच्या मुस्लिम युवक कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवून सत्तेसाठी शिवसेनेशी आघाडी करू नका अशी विनंती केली आहे. या पत्रात लिहिले आहे कि,’शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत आघाडी करण्याची पदाधिकाऱ्यांची भाषा म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजाची फसवणूक असून काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूपोटी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत जाऊन पक्षाचे नुकसान करुन घेऊ नका”. दरम्यान, मुस्लिम युवक कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राबाबत अद्यापही काँग्रेस पक्षातर्फे स्पष्टीकरण आलेले नाही.