जयपूर – वर्ष 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसाच्या 24 पैकी 18 हून अधिक तास काम करताना दिसतात. शिवाय सरकार चालवण्यासह आपल्या पक्षाच्या उर्जितावस्थेसाठी अव्याहत काम करत राहतात. हे पाहता कॉंग्रेसचे एक दिग्गज नेते मात्र एवढेसे काम करुन सातत्याने दमतात आणि नेहमीच सुट्टीवर जातात.
बरोबर ओळखलेत, हे नेते आहेत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी हे आपल्या मित्रांसह सुट्टीसाठी राजस्थानमधील जैसलमेरला एका खासगी विमानाने पोहोचले आहेत. राहुल गांधी जैसलमेरमध्ये दोन दिवस मुक्काम करणार आहेत. यासाठी तयारी सुरू आहे. येथील प्रशासनाला दहा लोकांच्या व्हीआयपी मूव्हमेंटची तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. राहुल गांधी पहिल्या दिवशी येथील सूर्यगड किल्ल्यावर मुक्काम करतील आणि दुसऱ्या दिवशी राहुल गांधी वाळवंटात तंबूत राहणार आहेत.
राहुल गांधी यांचा हा दौरा अतिशय गुप्त ठेवला जात आहे. राहुल गांधींच्या या दौ-याची तयारी सुरू करण्यात आली असून त्यांचे सीआरपीएफचे सुरक्षा पथक जैसलमेरला पोहोचले आहे. तसेच, राहुल गांधींनी येथील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना आपले स्वागत करण्यास नकार दिला आहे. याशिवाय, हॉटेल परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राहुल गांधी बुधवारी पहाटे नवी दिल्लाहून साडे सहा वाजता जैसलमेरच्या विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरून राहुल गांधी हे साम रोड येथील पंचतारांकित हॉटेल सूर्यगड किल्ल्याकडे रवाना झाले. जैसलमेरमध्ये राहुल गांधी एक रात्र वाळवंटातील तंबूत घालवणार आहे. यासाठी खास तंबू बनविण्यात येत आहेत. याचबरोबर, राहुल गांधी आपल्या या प्रवासादरम्यान उंट सवारी करतील. राजस्थानी पारंपारिक लोक संगीत नृत्याचा आनंद घेतील. मात्र, राहुल गांधींचा हा दौरा गोपनीय असणार आहे.