नवी दिल्ली – संसदेत गुरुवारी “ईडी”च्या गैरवापराच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू असतानाच कॉंग्रेसचे नेते मल्लिकाजुर्न खर्गे यांना “ईडी”ने समन्स बजावले. त्यांना दुपारी साडेबारा वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. स्वत: खर्गे यांनीच लोकसभेत ही माहिती दिली.
मल्लिकाजुर्न खर्गे म्हणाले की, “मी कायद्याचे पालन करणारा नागरिक असल्यामुळे चौकशीला हजर राहील. मात्र संसदेचे कामकाज सुरू असताना असे समन्स पाठवणे योग्य आहे का? बुधवारीही “यंग इंडिया”च्या कार्यालयाला टाळे ठोकल्यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. ते योग्य आहे का? अशाने लोकशाही जिवंत राहील का असा सवालही खर्गे यांनी केला.
आम्ही देशाच्या घटनेनुसार काम करू शकू का, आम्ही घाबरणार नाही. लढा देउ असे नमूद करत त्यांनी या विषयावर चर्चा केली जाण्याची मागणी केली.
मोठी बातमी! संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत सुनावली कोठडी
“सीबीआय”, “आयटी”, “ईडी” या केंद्रीय तपास संस्थांच्या दुरूपयोगाबाबत चर्चा करण्याची मागणी कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता तर लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजता स्थगित करण्यात आले.
“१५ ऑगस्टच्या आधी शपतविधी निश्चितपणे होईल, याबाबत…” सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक वक्तव्य