नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन वेळोवेळी दिले पण प्रत्यक्षात त्यांनी शेतकऱ्यांचे नव्हे तर अडानी आणि अंबानी यांचे उत्पन्न दुप्पट केले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
जे शेतकऱ्यांच्या विरोधतील कायदे शेतकऱ्यांच्याच लाभाचे आहेत असे अजूनही म्हणत आहेत ते काय खाक शेतकऱ्यांचे हित साधणार असा सवालही त्यांनी केला आहे. आता होणार किसान की बात असे ट्विटवर नमूद करीत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
राहुल गांधी यांनी पहिल्यापासूनच पंजाब व हरियानातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून स्वताही टॅक्टर यात्रा काढली होती.