नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया असून त्यांनी थेट या हिंसाचाराचा आरोप काँग्रेस पक्षावर केला आहे.
ते म्हणाले,’भारतातील शेतकरी कधीच हिंसाचार करणार नाही . या हिंसाचाराला जबाबदार फक्त काँगेस पक्ष आहे . कारण त्यांनी कधीच शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार केला नाही. काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत आहे. असं म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.