पुणे – “कॉंग्रेस पक्षाने नेहमी आधुनिक विचार करून देशाचा विकास केला,’ असे मत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. पक्षाच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे छायाचित्र प्रदर्शन व ध्वनीचित्रफितीमार्फत पक्षाच्या वाटचालीचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविकपर भाषणात पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, “कॉंग्रेस पक्षाचा मोठा इतिहास आहे. लॉर्ड ए. ओ. ह्युम यांनी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. महात्मा गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहामुळे ब्रिटिशांना नाईलाजाने भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. गेल्या 135 वर्षात कॉंग्रेसने देशासाठी अनेक प्रगतीची पावले उचलून देशाचा विकास केला.’
माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, “समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम कॉंग्रेस पक्षाने 135 वर्षे केले आहे. महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने करून स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.’
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, सोनाली मारणे, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रजनी त्रिभुवन, डॉ. सतीश देसाई, विरेंद्र किराड, सुनिल मलके, प्रविण करपे, सचिन आडेकर, सतीश पवार, विजय खळदकर, सुनील घाडगे, भुजंग लव्हे, सादिक शेख, ऋषिकेश बालगुडे, मीरा शिंदे, प्रकाश पवार, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, विनय ढेरे, आयुब पठाण, सुरेश कांबळे, सुनील दैठणकर, बाळासाहेब मारणे, शिलार रतनगिरी, विठ्ठल गायकवाड, प्रशांत वेलणकर, राजू गायकवाड, देवीदास मगर, अविनाश अडसूळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरव बोराडे यांनी, तर आभार विशाल मलके यांनी मानले.