नवी दिल्ली – पाच राज्यांमध्ये कॉंग्रेसला पुन्हा एकदा दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्या पंजाबमध्ये कॉंग्रेसचे सरकार होते, तिथे लोकांनी पक्षाला नाकारले आहे. कॉंग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षातील नाराज गट म्हणजेच जी-23 गट पुन्हा सक्रिय झाल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी या गटाच्या नेत्यांची बैठक झाली. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि मनीष तिवारीही यात सहभागी झाले होते. बैठकीत त्यांनी अखिल भारतीय कॉंग्रेसची तातडीची बैठक घेऊन लवकरात लवकर कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यात कॉंग्रेसने पूर्ण ताकद लावली होती, तिथे कॉंग्रेसच्या खात्यात केवळ दोन जागा आल्या. एवढेच नाही तर पक्षाचे मताधिक्यही घटले. पंजाबमध्येही कॉंग्रेसची सत्ता गेली. कॉंग्रेसला येथे 18 जागा मिळाल्या.
Delhi | Senior Congress leaders Manish Tewari and Kapil Sibal arrive at the residence of party leader Ghulam Nabi Azad. pic.twitter.com/SPEKtAPw4t
— ANI (@ANI) March 11, 2022
2017 मध्ये कॉंग्रेस 77 जागा जिंकून सत्तेत आली होती. मात्र यावेळी आम आदमी पक्षाने कॉंग्रेसच्या स्वप्नांवर झाडू फिरवला आहे. इतकेच नाही तर उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरसह ज्या राज्यांमध्ये पुनरागमन अपेक्षित होते त्या राज्यांमध्येही पक्षाची कामगिरी खराब झाली.
देशातील राज्यांमध्ये पडझडीच्या मालिकेनंतर पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील नाराज गट एकवटला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या घरी त्यांनी बैठक घेतली आहे. बैठकीत त्यांनी अखिल भारतीय कॉंग्रेसची तातडीची बैठक घेऊन लवकरात लवकर कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.