नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून कॉंग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना दहा प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. पंतप्रधान मोदी, तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप कॉंग्रेसने केला.
कॉंग्रेसने केलेले हे आरोप आणि त्या दहा प्रश्नांचा थेट संबंध हा भाजप-जनता दल (यु) सरकारच्या कामकाजाबद्दल तयार केलेल्या आरोपपत्राशी आहे. कॉंग्रेसने मोदी यांना विचारले आहे की, केंद्र सरकार बिहारला विशेष राज्याचा दर्जा का देत नाही, उर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी बिहारच्या या मागणीला फेटाळून का लावले? सिंह यांची ही भूमिका तुम्हालाही मान्य आहे का?
भाजपाचे नेते रणदीप सुरजेवाला, पवन खेडा यांना असे विचारले आहे की, गेल्या निवडणुकीत 500 कोटी गुंतवणुकीतून भागलपूरमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा झाली होती; त्याचे काय झाले? बिहारला खोटी आश्वासने का? वर्ष 2015 मध्ये कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले? बक्सरच्या चौसा गावात 10 हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या 1300 मेगावॅट थर्मल पॉवर प्लांटचे पुढे काय झाले?
या प्रश्नांमध्ये असेही विचारण्यात आले आहे की, मनिहारी ते साहिबगंज पूल का नाही बनला? चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा चार पदरी रस्ता का तयार झाला नाही? तुमची आश्वासने खोटी का?