कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये कॉंग्रेस व डाव्या पक्षांची महाआघाडी तृणमुल कॉंग्रेस व भाजपचा पराभव करील असा विश्वास ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी व्यक्त केला आहे. येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर त्यांनी आज पक्षाच्या प्रचार सभेला प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आजच्या आमच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पहाता पश्चिम बंगाल मधील निवडणूक ही दुरंगी लढत न राहता तिरंगी लढत होईल आणि त्यात आम्हीं विजयी होऊ असा पुर्ण विश्वास आम्हाला वाटतो आहे.
आमच्या दोन पक्षांशिवाय राज्यात तिसरा कोणताही पक्ष अस्तित्वात असता कामा नये अशी तृणमुल कॉंग्रेस व भाजप नेत्यांची धारणा आहे. पण भविष्यातयो दोन्हीं पक्षांचेच अस्तित्व राज्यात राहणार नाही आणि राज्यातील जनता कॉंग्रेस व डाव्या आघाडीलाच साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.