मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारण तापले आहे. भाजप नेते यावर सावध भूमिका घेत असून यावर बोलणे टाळत आहे. तर विरोधी पक्ष यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यात अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या चॅटमधून स्पष्ट दिसत आहे. हे चॅट प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? हा देशद्रोहाचा प्रकार असून गोस्वामींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
Called on Hon’ble HM @AnilDeshmukhNCP ji demanding arrest of Arnab Goswami under section 5 of Official Secret Act. Also demanded EOW Inquiry on complaint of DD against Republic TV. HM said he will take legal opinion & consult with sr police officers#ArnabChatGate pic.twitter.com/USZ1n9jb5T
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 19, 2021
संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे, हे अत्यंत गंभीर आहे. गोपनीय माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्यांनी स्वतः सांगितले आहे की, ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे, सचिन सावंत म्हणाले.