नवी दिल्ली : एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर अपयशी ठरल्याबद्दल आम आदमी पार्टी (आप) आणि कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपवर जोरदार टीका केली. जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत घेत, ‘आप’ सरकार गेली साडेचार वर्षे झोपेत आहे. आप भाजपने केलेल्या कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) विरोधात आप आणि कॉंग्रेसने दिल्लीत हिंसाचार घडवून आणला असेही ते म्हणाले. आपचे आमदार अमानतुल्ला खान यांनी दंगल भडकविणारे वक्तव केले त्यामुळे दिल्लीतील वातावरण बिघडले असा द्वा त्यांनी केला.
जावडेकरांच्या आरोपला उत्तर देताना आपने ट्विट केली के भाजपने गॅस सिलिंडरच्या किंमतीत 19 रुपयांची वाढ केली याला कोण जबाबदार आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट केले की, “मोदी सरकारने जनतेला नवीन वर्षाची पहिली महागडी भेट दिली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 19 रुपयांची वाढ झाली. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 29.50 रुपयांची वाढ झाली. गेल्या पाच महिन्यांत 137 रुपयांनी किमती वाढल्या. वाढत्या महागाईमुळे गृहिणी त्रस्त आहेत. पण भाजप सत्तेच्या गुर्मीत असल्याचे ते म्हणाले. सुरजेवाला यांनी रेल्वे भाडेवाड बद्दलही प्रश्न उपस्थित केला.