नवी दिल्ली :- केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी सप्टेंबर व ऑक्टोबरपासून देशांतर्गत क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होईल, असे सांगितले असले तरीही करोनाचा धोका कायम असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. क्रीडा मंत्रालयातील एका सूत्राने सांगितल्यानुसार स्पर्धा दिवाळीपूर्वी सुरू करणे धोक्याचे ठरेल, असे मत व्यक्त केले.
मार्चपासून करोनाचा धोका वाढत गेल्याने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. लोकांमध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सप्टेंबरपासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात होईल, असे संकेत रिजीजू यांनी दिले होते. मात्र, करोनाची वाढती स्थिती पाहता दिवाळीपूर्वी स्पर्धा होणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे.