औरंगाबाद मधील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीला लोकप्रतिनिधींची दांडी
औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासंदर्भाल लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी आमदारांना जाब विचारत बैठकीत गोंधळ घातला. औरंगाबादेत मराठवाड्यातील आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकील फक्त नऊ आमदार उपस्थित होते. यामुळे आमदार प्रशांत बंब यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
मराठवाड्याचा पाणीप्रश्नी औरंगाबादमधील हॉटेल अजिंठा आंबे सिटरमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला मराठवाड्यातील 55 आमदारांपैकी केवळ 10 आमदार उपस्थित होते. यातील नऊ आमदार भाजपचे, तर शिवसेनेचे एकमेव आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. तर काही वेळातच संजय शिरसाठ यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळे या बैठकीत विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्तांनी आमदारांना धारेवर धरले.
मराठवाड्यातला पाणीप्रश्न गंभीर
मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा, टॅंकरवाडा अशी विशेषणे लागली आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न प्रचार केला गेला. महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली. पण या योजनेला देखील महाविकास आघाडी कात्री लावण्याच्या तयारीत आहे. यापुढे मुंबईत एक बैठक बोलावली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून येत्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्नी तरतूद करण्याची सरकारला विनंती केली जाणार असल्याचे या बैठकीला उपस्थित आमदारांनी सांगितले.