संगमनेर -तालुक्याच्या पठार भागात केळेवाडी शिवारात रविवारी (दि.24) सकाळी 10 वाजेच्या पाण्यावरून शेतकऱ्यांत पाण्यासाठी संघर्ष झाला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात 29 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत केळेवाडी येथील शेतकरी सुभाष बाजीराव लामखडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि.24) सकाळी शेतकरी उत्तम भागा लामखडे, मनाभाऊ वामन लामखडे, विश्वास बाळू पाडेकर, प्रमोद उत्तम पाडेकर, दिगंबर युवराज पाडेकर, सागर सुनील पाडेकर, दत्तात्रय रामदास पाडेकर, रावसाहेब बारकू पाडेकर, सखाराम रामभाऊ लामखडे, बाळू बंडू पाडेकर, प्रवीण बबलू लामखडे, विकास बाळू पाडेकर, प्रशांत दिलीप पाडेकर, सूरज रावसाहेब पाडेकर, रोहन उत्तम पाडेकर, सुनील मनाभाऊ पाडेकर, अविनाश बाळू पाडेकर, प्रतीक प्रवीण लामखडे, प्रवीण बबन लामखडे, मच्छिंद्र बबन लामखडे, गोरख बाळाभाऊ लामखडे, उत्तम खंडू पाडेकर, रामदास भागा लामखडे, सुनील खंडू पाडेकर, राजू पोपट लामखडे, पवन रामदास पाडेकर, लहू गोपाळा पाडेकर, युवराज बारकू पाडेकर, दिलीप अर्जुन पाडेकर यांनी जमावबंदी व संचारबंदीचा आदेश असतानाही सुभाष लामखडे यांच्या बोअरच्या पाईपलाईनचे नुकसान केले. सुभाष लामखडे यांनी दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.