पुणे: हिंगणघाट प्रकरणावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करत असताना चित्रा वाघ यांची जीभ घसरली. त्यांच्या या टीकेला रुपाली चाकणकर यांनी तिखट शब्दात उत्तर दिले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “चिञा वाघ,थोडीफार माहिती घेऊन बोलत जा, वाईट वाटतंय असं तुम्हाला पाहुन, स्वतःच्या अस्तित्वासाठीची हि केविलवाणी धडपड. कायम सत्ताधारींवर टिका करावी लागते तुम्हाला, जिकडे जाता तिकडे सत्तेतुन पायउतार व्हावे लागतेय……..पायगुण. विरोधक म्हणून शुभेच्छा पण अशा ठिकाणी राजकारण करू नका जिथे माणसाच्या जगण्याचा संघर्ष चालु असतो आणि सारा महाराष्ट्र त्यासाठी प्रार्थना करतोय आणि आपण राजकारण करता.”
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
महाराष्ट्र राज्यात महिलांवर दुर्दैवी घटना घडत आहे. राज्य सरकार या घटना रोखण्यासाठी अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकारकडून केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. पीडित मुलीला सरकारकडून एकही रुपया दिला नाही. रुग्णालयात पीडित मुलीच्या आई वडिलांना रुग्णालयातून पैसे मागत आहे. सरकारकडून मुलीचा खर्च होत नसेल तर भारतीय जनता पक्ष हा खर्च उचलणार.
रुपाली चाकणकर यांच्या टीकेनंतर चित्रा वाघ यांचा राग अनावर
चाकणकर ही बाई बावळट आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेला 11 वाजून चार मिनिटांपर्यंत पीडितेच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर 10 मिनिटांनी पैसे जमा झालेत. या प्रकरणी दोन दिवसांपासून सरकार घोषणा करत आहे. लाज नाही वाटत काय खोटं बोलायला. सरकारचा हा खोटारडेपणा होता, तो जनतेपुढं आणणार.