मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात एकाच दिवसात 12 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज कोल्हापुरात दोन नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. यात मुंबईतील लोकसंख्या दोन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन जर चुकून झालं तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आज मुंबईत सर्वाधिक 51 कोरोना रुग्णांची संख्या आहे. दरम्यान, देशातही हा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे.
आज घडीला देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय. दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातील कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाले आहे.