– मुख्य सचिवांचे निर्देश
मुंबई : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनामाने सुरू असून या कामाला गती देऊन ते बुधवारपर्यंत (6 नोव्हेंबर) पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सोमवारी येथे दिले. शेतकछयांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने 10 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मेहता यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मेहता यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडीओ क्ाय्न्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जिल्हानिहाय कृषी क्षेत्राचे किती नुकसान झाले याची माहिती घेतली. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामाला गती देताना ते अचूक होतील याकडे लक्ष द्यावे, असे मुख्य सचिवांनी सांगितले.
सर्व पंचनामे 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती आल्यास ते 8 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजेत. पंचनामे करताना तलाठी, ग्रमसेवक, कृषी सहाय्यक आणि ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठे आहेत तेथील कर्मचाछयांची मदत घ्यावी. विभागीय आयुक्तांनी पंचनामे अंतिम करून ते कृषी आयुक्तांकडे पाठवावेत. पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांनी आवश्यक ती मदत करावी, अशी सूचना मेहता यांनी केली.
पाऊस झाल्याने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी लगबग करतील. हंगामात बी-बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही यासाठी जिल्हाधिकाछयांनी दक्षता घ्यावी. खते, बी-बियाणांची टंचाई असल्यास ते सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते.