नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे पुर्व दिल्ली मतदार संघातील उमेदवार गौतम गंभीर यांनी विना परवाना रॅली घेतल्याबद्दल, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी गौतम गंभीर विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
आज म्हणजे २८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता गौतम गंभीर यांनी विना परवाना रॅली घेतल्यामुळे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आम आदमी पक्षाच्या अतीशी मार्लेना यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मागील तीन दिवसांमध्ये गौतम गंभीर यांनी दुसऱ्यांदा विना परवाना रॅली घेऊन आचारसंहिता भंग केले असल्याचे या तक्रारीत म्हंटले आहे.
Atishi, AAP candidate from East Delhi Lok Sabha seat writes to Returning Officer (RO) regarding repeated violation of model code of conduct by Gautam Gambhir, BJP's candidate from East Delhi, by holding rally without permission on April 28. pic.twitter.com/8qnNOA9LKL
— ANI (@ANI) April 28, 2019
दरम्यान, याअगोदर दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी अतीशी मार्लेना यांनी गौतम गंभीर विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती.